ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !

अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीत उघड

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने -एन्फोर्समेंट डायरेक्टरेट) बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना भारतात स्थायिक करण्यात एक मोठे जाळे कार्यरत असल्याचे उघड केले आहे. या संदर्भात उत्तरप्रदेश, देहली, हरियाणा, बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये ‘ईडी’ने धाडी घातल्या. हे जाळे परदेशातून मिळालेल्या पैशांचा वापर घुसखोरांचे बनावट दस्तऐवज सिद्ध करण्यासाठी, त्यांना देशाच्या विविध भागांत पाठवण्यासाठी आणि त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करण्यासाठी करत होते. या जाळ्याचे धागेदोरे आतंकवादी अर्थपुरवठ्याशी जोडलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१. ‘ईडी’ने उत्तरप्रदेशातील सहारनपूर (देवबंद), देहलीतील जामिया नगर, हरियाणातील बल्लभढ, बंगालमधील दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा आणि मुर्शिदाबाद, तसेच महाराष्ट्रातील रायगड अशा एकूण १३ ठिकाणांवर एकाच वेळी धाडी घातल्या.

२.  या धाडीमध्ये बंगालमधील कलिकापूर भागातील ‘हरोरा अल-जामियातुल इस्लामिया दारुल उलूम’मधून ४० लाख रुपये रोख आणि १८० ग्रॅम सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत.

३. ‘ईडी’ अशा टोळीच्या कारवायांचा तपास करत आहे, जी ‘परकीय चलन विनियमन कायद्यां’तर्गत (‘फेरा’ – फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट) नोंदणीकृत ट्रस्ट आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून कार्यरत आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

४. घुसखोरांना साहाय्य करणार्‍या जाळ्यासह काही न्यास, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्याशी संबंधित व्यवहारांची चौकशी केली जात आहे. अनेक बँक खात्यांच्या वापराचीही चौकशी केली जात आहे.

५. यापूर्वी उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाच्या अन्वेषणात समोर आले आहे की, काही संस्थांना विदेशी देणग्या मिळाल्या आणि अवैध कारवायांना साहाय्य करण्यासाठी बँक खाती, मध्यस्थांची खाती आणि गुंतागुंतीच्या व्यवहारांद्वारे पैसे हस्तांतरित करण्यात आले. संशयितांना भारतात स्थायिक करण्यासाठी ६, ८ आणि १० सहस्र रुपयांच्या छोट्या हप्त्यांमध्ये पैसे पाठवले गेले.

संपादकीय भूमिका

यामध्ये सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीचीच शिक्षा करा !