कल्याण – येथील महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी अल्प व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे यासाठी महानगरपालिका प्रशासन अन् वाहतूक शाखा यांच्या वतीने केलेल्या संयुक्त कारवाईत दिवसभरात ४१ वाहने जप्त करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. ‘जप्त करण्यात आलेली वाहने सोडवण्यासाठी वाहनचालकांना दंड भरावा लागणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी, तसेच रस्त्यावर, रस्त्यालगत उभी असलेली बेवारस, भंगार वाहने उचलण्याची ही कारवाई यापुढेही चालू रहाणार आहे’, असे वाहतूक शाखेचे अधिकारी सुखदेव पाटील यांनी सांगितले.
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल
मुंब्रा येथे बनावट वैद्यकीय व्यवसाय करणार्यांवर कारवाई !