
मुंबई – देहली, राजस्थान, गुजरात, गोवा या चार राज्यांमधून महाराष्ट्रात विमान, रेल्वे यांद्वारे येणार्यांना कोरोनाची चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. या प्रवाशांचा कोरोनाचा आर्.टी.पी.सी.आर्. अहवाल हा ‘निगेटिव्ह’ असणे आवश्यक आहे, असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे. बसने येणार्या प्रवाशांची महाराष्ट्राच्या सीमांवर तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सरकारने हा आदेश काढला आहे. यासंबंधीची नियमावलीही घोषित केली आहे. महाराष्ट्रात येणार्या प्रवाशांमुळेही कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो हे लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे.
विमानाने महाराष्ट्रात येणार्या प्रवाशांचा आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी अहवाल ७२ घंटे आधीचा असावा. हा अहवाल ज्या प्रवाशांसोबत नसेल, त्यांना विमानतळावर आल्यानंतर तपासणी करावी लागेल. विमानतळांनी यासंदर्भातील तपासणी केंद्र उभारले पाहिजे. या चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून घेण्यात येईल. आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी अहवाल ‘निगेटिव्ह’ असणार्या प्रवाशांनीच रेल्वेने प्रवास करावा, तसेच हा अहवाल सोबत आणावा. या प्रवाशांनी आर्.टी.पी.सी.आर्.ही चाचणी मागील ९६ घंट्यांमध्ये केलेली असावी, असे या आदेशात म्हटले आहे.
रस्ते मार्गाने प्रवासी येत असल्यास राज्याच्या सर्व सीमांवर या प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली, तर त्यांना राज्याच्या सीमेवरूनच परत पाठवले जाणार आहे.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !