(म्हणे) ‘बांगलादेशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी तडजोड करणार नाही !’ – Jamaat-e-Islami

घुसखोरांना मायदेशी पाठवण्याच्या भारताच्या मोहिमेला बांगलादेशाचा विरोध !

‘जमात-ए-इस्लामी’ चे साहाय्यक सरचिटणीस हमीदुर रहमान आझाद

ढाका (बांगलादेश) –  बांगलादेशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कधीही तडजोड केली नाही अन् करणार नाही. लोकांना बलपूर्वक परत पाठवण्याला आम्ही विरोध करू, अशी चेतावणी ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरतावादी संघटनेचे साहाय्यक सरचिटणीस हमीदुर रहमान आझाद यांनी भारताच्या बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याच्या दिली. ११ इस्लामी पक्षांना हाताशी धरून जमात-ए-इस्लामी देशव्यापी निदर्शने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आझाद पुढे म्हणाले की, लोकांना बलपूर्वक परत पाठवण्याचे प्रकार रोखण्यासाठी ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ अधिक बळकट केले पाहिजे. सीमावर्ती भागातील लोकांनी मानवी साखळी सिद्ध केली पाहिजे, जेणेकरून आतंकवादी, तस्कर किंवा गुन्हेगार बांगलादेशात प्रवेश करू शकणार नाहीत.

आझाद यांनी दावा केला की, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत सीमेवरील ५० हून अधिक ठिकाणांवरून २ सहस्र ४७९ लोकांना बांगलादेशात बलपूर्वक  ढकलण्याचा प्रयत्न झाला. फेब्रुवारीपासून आतापर्यंत भारताच्या ‘सीमा सुरक्षा दला’च्या गोळीबारात १९ बांगलादेशी नागरिक मारले गेले.

संपादकीय भूमिका

गेली ७ दशके बांगलादेशी घुसखोरांना भारतात घुसवतांना भारताच्या सार्वभौमत्वाची पायमल्ली केली गेली, त्याचे काय ? जमात-ए-इस्लामीसारख्या संघटना काहीही म्हणोत भारत सर्व बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात हाकलणारच आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !