घुसखोरांना मायदेशी पाठवण्याच्या भारताच्या मोहिमेला बांगलादेशाचा विरोध !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कधीही तडजोड केली नाही अन् करणार नाही. लोकांना बलपूर्वक परत पाठवण्याला आम्ही विरोध करू, अशी चेतावणी ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरतावादी संघटनेचे साहाय्यक सरचिटणीस हमीदुर रहमान आझाद यांनी भारताच्या बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याच्या दिली. ११ इस्लामी पक्षांना हाताशी धरून जमात-ए-इस्लामी देशव्यापी निदर्शने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आझाद पुढे म्हणाले की, लोकांना बलपूर्वक परत पाठवण्याचे प्रकार रोखण्यासाठी ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ अधिक बळकट केले पाहिजे. सीमावर्ती भागातील लोकांनी मानवी साखळी सिद्ध केली पाहिजे, जेणेकरून आतंकवादी, तस्कर किंवा गुन्हेगार बांगलादेशात प्रवेश करू शकणार नाहीत.
आझाद यांनी दावा केला की, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत सीमेवरील ५० हून अधिक ठिकाणांवरून २ सहस्र ४७९ लोकांना बांगलादेशात बलपूर्वक ढकलण्याचा प्रयत्न झाला. फेब्रुवारीपासून आतापर्यंत भारताच्या ‘सीमा सुरक्षा दला’च्या गोळीबारात १९ बांगलादेशी नागरिक मारले गेले.
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
Pakistani Brutality Rawalakot PoK : रावलकोट (पाकव्याप्त काश्मीर) : पाक सैन्याने पुन्हा केले १६ नागरिकांना ठार !
ब्रिटन : युवतीवर बलात्कार करणार्या पाकिस्तानी नागरिक शेराज मलिकला १० वर्षांची शिक्षा !
Assam Auto Driver Sexual Assault : गौहत्ती (आसाम) येथे हिंदु तरुणीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
#Boycott_Amazon : हिंदु जनजागृती समितीकडून ‘ॲमेझॉन इंडिया’ला कायदेशीर नोटीस !