Bengal Cow Slaughter : बंगालमधील गोहत्या बंदीच्या विरोधात साम्यवाद्यांची कोलकाता उच्च न्यायालयात याचिका

सरकारने धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घातल्याचा आरोप

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील सुवेंदू सरकारच्या ‘पश्चिम बंगाल पशुवध नियंत्रण अधिनियम, १९५०’ हा कायद लागू करण्याच्या आदेशाविरुद्ध  कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन (सीपीआय-एम्एल्)च्या बंगाल शाखेने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. ‘न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा’, अशी मागणी यात करण्यात आली आहे. या कायद्यानुसार गोहत्या करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

याचिकेत दावा करण्यात आला आहे की, हा कायदा लागू करणे म्हणजे मुसलमानांचे धार्मिक स्वातंत्र्य, पशु व्यापाराशी संबंधित शेतकर्‍यांची (जे बहुतांश हिंदु समुदायातील आहेत) उपजीविका, नागरिकांच्या स्वतःच्या आवडीचे अन्न खाण्याचे स्वातंत्र्य आणि बंगालच्या खाद्य संस्कृतीची विविधता, यांवर केलेले आक्रमण आहे. हा कायदा लागू करण्यामागचा उद्देश प्राण्यांच्या बळीवर बंदी घालणे, हा आहे.

संपादकीय भूमिका

‘धर्म ही अफूची गोळी आहे’ म्हणणार्‍या साम्यवाद्यांनी कधी हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याचा इतिहास नाही; मात्र मुसलमानांच्या अधिकारांसाठी लगेच ते कृतीशील झाले आहेत. यामुळेच ते भारतातून नामशेष होत आहेत आणि लवकरच इतिहासजमा होणार आहेत !