Exit Polls : बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना घरचा रस्ता, भाजप सत्तेवर येण्याचे अनुमान !

  • आसाम, पुद्दूचेरी आणि तमिळनाडू येथे सत्तापालटाची चिन्हे नाहीत !

  • केरळम्मध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार येणार !

नवी देहली – बंगाल, आसाम, पुद्दूचेरी, तमिळनाडू आणि केरळम् राज्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून मतदानोत्तर चाचण्यांचे (‘एक्झिट पोल’चे) आकडे समोर आले आहेत.

त्यानुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेचा अस्त होतांना दिसत आहे. तेथे भाजपकडे सत्तेची सूत्रे येण्याची चिन्हे आहेत. तर आसाममध्ये भाजपच पुन्हा सत्तेवर येऊन हिमंत बिस्वा सरमा यांना दुसरा कार्यकाळ मिळू शकतो. तिथे दक्षिण भारतात पुद्दूचेरीत भाजप आघाडी पुन्हा निवडून येण्याचे अनुमान आहे. तसेच तमिळनाडूत द्रमुकलाच पुन्हा सत्ता मिळणार असल्याचे मतदानोत्तर चाचण्या सांगतात. केरळ राज्यांत मात्र संयुक्त लोकशाही आघाडी आणि काँग्रेस या आघाडीची सत्ता येऊ शकते.