गोमाता, धर्म, शास्त्र, मंदिर यांच्या रक्षणासाठी शंकराचार्यांना ‘चतुरंगिणी सेना’ उभारावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

‘ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे सशस्त्र ‘चतुरंगिणी सेने’च्या स्थापनेची घोषणा केली. या सेनेत एकूण २ लाख १८ सहस्र ७०० सदस्यांचा समावेश करण्याचे लक्ष्य असून देशभरातील लोक यात सहभागी होऊ शकतील. ‘ही सेना गोसंरक्षण, धर्मसंरक्षण, शास्त्रसंरक्षण आणि मंदिरसंरक्षण यांसाठी कार्य करील’, असे त्यांनी सांगितले. या सेनेसाठी २७ सदस्यीय पदाधिकार्‍यांची घोषणा करण्यात आली आहे. या सेनेचे अध्यक्ष स्वतः शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती असतील.’ (२५.३.२०२६)