
मुंबई – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील ३ सहस्र ५४२ कोटी रुपयांच्या खर्चासंदर्भात ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. ‘लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख चुकीच्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. (चुकीच्या लाभार्थ्यांकडून सव्याज पैसे वसूल करणार का ? एवढे लाभार्थी झालेच कसे ? हे प्रशासनाचे अपयश नाही का ? – संपादक)
६० लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया केलेली नाही. आयकर विभागाने दिलेल्या महिलांची संख्या ५ लाख आहे. घरातल्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असलेल्या महिलांची संख्या १४ ते १५ लाख आहे. वाहन नावावर असलेल्या महिलांची संख्या ५ लाख आहे, साडेचार लाख महिलांचे वय ६५ पेक्षा अधिक आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ‘ई-केवायसी करणार्या महिलांना लाभ मिळत नाही, अशा काही तक्रारी किंवा निवेदने िमळाली होती, त्याची पडताळणी चालू आहे’, असेही तटकरे यांनी सांगितले. या योजनेत २ कोटी ६३ लाख महिलांची मूळ नोंदणी करण्यात आली होती.
पुरुषांकडून पैसे वसूल करणार ! – आदिती तटकरे
ज्या पुरुषांनी महिला म्हणून लाडकी बहीण योजनेचा अपलाभ घेतला आहे, त्या पुरुषांकडून योजनेचे सर्व पैसे वसूल करण्यात येणार असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर