मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ९ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ घंटा राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

गणेशोत्सवानंतर मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यात येतील ! –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्‍वासन

शिवसंग्राम आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यभरात नुकतेच मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले. आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम त्वरित स्थगित करावेत ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग ही धोक्याची चेतावणी आहे. हे सर्वांनी गांभीर्याने घेतले नाही, तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.

आक्रमण करणार्‍या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांवर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण

सरकार सणांच्या नाही, तर कोरोनाच्या विरोधात ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत, याची मला जाणीव आहे; पण गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त होत असतांनाही आशीर्वादासाठी यात्रा काढल्या जात आहेत !

लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतील, असे उपक्रम राबवले जात आहेत. देशात समाजकारणापेक्षा राजकारण १०० टक्के केले जात आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करत भाजपला टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांना ७५ सहस्र पत्रे पाठवून भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याची आठवण करून देऊ ! – आशिष शेलार, भाजप

भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने ७५ सहस्र ‘पोस्टकार्ड’ पाठवून भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली, याची मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी २५ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

जनतेला (दळणवळण बंदीत) सवलती देण्यासाठी आणखी काही दिवस थांबावे लागेल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाचा संदर्भ देत राजकीय विषयावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘अद्यापही हे संकट पुरते गेलेले नाही. नवे विषाणू येत आहेतच; पण काही जुने विषाणूही परत आले आहेत. हे जुने विषाणू वेगवेगळे ‘साइड इफेक्ट्स’ पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

गुन्हे रहित व्हावेत, यासाठी नारायण राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या

(म्हणे) ‘राष्ट्राविषयी अज्ञान दाखवले म्हणून बोललो !’ – राणे यांचे पत्रकार परिषद घेऊन समर्थन !

नारायण राणे म्हणाले, ‘‘दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. देशात अद्यापही कायद्याचे राज्य आहे. भाजप माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला. मी असे काय बोललो होतो की, राग आला ? मुख्यमंत्र्यांविषयी बोललेले ते वाक्य मी परत बोलणार नाही.