गुन्हे रहित व्हावेत, यासाठी नारायण राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

नारायण राणे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. या तक्रारीवरून नाशिक, पुणे आणि महाड येथे राणे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. हे गुन्हे रहित व्हावेत, यासाठी नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही.