नक्षलवादाविषयीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देहली येथे जाणार !

केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ सप्टेंबर या दिवशी देहली येथे दौर्‍यावर जाणार आहेत.

मुंबई-नागपूर ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाच्या पाठीशी राज्य सरकार सर्वशक्तीनिशी उभी राहील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याने मोठ्या संयमाने लढा देत मराठवाड्यालाही मुक्ती मिळवून दिली आहे, तसाच लढा कोरोनामुक्तीसाठी द्यायचा आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

संतपिठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मराठवाडा येथे संतपीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ सप्टेंबर या दिवशी येथे केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या मार्गदर्शनाखाली हे संतपीठ चालू केले जाणार असून लवकरात लवकर ते मोठे विद्यापीठ व्हावे…

कोकणात आपत्ती व्यवस्थापनासाठी ३ सहस्र २०० कोटी रुपयांची तरतूद

यामुळे कोकणात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी अल्प होण्यास साहाय्य होणार आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान न्यासाच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे.

राज्याचे प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावणार ! – नीती आयोग

जी.एस्.टी. परतावा, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कांजूर मार्ग मेट्रो डेपो, धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची भूमी मिळणे यांसह राज्याचे केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय नीती आयोगाच्या अधिकार्‍यांनी दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडे दिले दायित्व !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर या दिवशी संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला होता, तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपिठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडे सोपवण्याची सूचना केली होती. 

वीजदेयकाच्या थकबाकीचे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास राज्य अंधारात जाईल ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महावितरणसमोर सध्या एकूण ७३ सहस्र ८७९ कोटी रुपयांची थकबाकी आहे; मात्र वीजदेयकाच्या थकबाकीचे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास राज्य अंधारात जाईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी बोलून दाखवली.

साकीनाका येथील महिलेवरील बलात्कार प्रकरणी एका मासात आरोपपत्र प्रविष्ट करा ! – मुख्यमंत्री

या वेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जलदगती न्याय काय असतो, ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे; जेणेकरून पुढे कुणी असे धाडस करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची सिद्धता करावी.

जनतेला जागरूक करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जनतेच्या मनातील असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते. ‘आज आपण सर्वांनी, तसेच विविध मंडळे, संस्था यांनीही कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी; म्हणून प्रयत्न करायला हवेत