हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याने हिंदु धर्म आणि समाज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात रामनवमी शोभायात्रा समिती आणि भाजप यांच्या वतीने रोष व्यक्त करून शरजील याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये आग

येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये ३ फेब्रुवारी या दिवशी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना लोकवस्तीजवळ घडली; मात्र यामध्ये जीवितहानी झाली नाही.

पालघर येथे ११ मुलांना विषबाधा, मुलांची प्रकृती स्थिर

पालघर येथील किरत गावात एका लग्नासाठी आलेल्या ५ ते १२ वयोगटातील मुलांना विषबाधा झाली. जेवल्यानंतर या मुलांना उलटी आणि मळमळ होण्यास आरंभ झाला.

कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर चालू करावे ! – खासदार उदयनराजे भोसले

प्रशासकीय मान्यता मिळालेला कराड-चिपळूण रेल्वेमार्ग लवकरात लवकर चालू करावा, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कंत्राटदारांच्या भ्रष्टाचाराविषयी मुंबई महापालिकेत निनावी पत्र

कंत्राटदार हातचलाखी करत असल्याचे निनावी पत्र महापालिकेत आले आहे. ‘सॅप’ प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना साहाय्य केले जात असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासाचे ‘चित्रकूट’ हे नाव पालटून ‘लंका’ ठेवावे !

भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

‘हा निवळ अपर्कीतीचा हेतू, काही तथ्य नाही !’ – धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्याचे प्रकरण

गिरगाव चौपाटी परिसरातील वडाचे झाड तोडणार्‍यांवर कठोर कारवाई करावी ! – पर्यावरणप्रेमी नागरिकांची मागणी 

गिरगाव चौपाटी भागातील तांबे चौकातील सिग्नलला लागून असलेले वडाचे झाड ३ फेब्रुवारीच्या पहाटे कापण्यास आरंभ करण्यात आला. संध्याकाळपर्यंत हे झाड पूर्णपणे कापण्यात आले. याविषयी पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या रुग्णावर उपचाराचे निर्बंध शिथिल करण्यासाठी खासगी रुग्णालयांची याचिका

कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने काही जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांवरील खाटा राखीव ठेवण्यासह उपचाराच्या दरांचे बंधन शिथिल करण्याची मागणी रुग्णालयांनी केली आहे. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि काही खासगी रुग्णालये यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.

राज्यशासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण न केल्यास होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करू ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा १ वर्षापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.