अध्यात्मात संशोधन करावे लागत नाही !
‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने संशोधन करावे लागत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने संशोधन करावे लागत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जगातील वैद्य, अभियंता, अधिवक्ता, वास्तूविशारद इत्यादी विविध विषयांतील तज्ञ, तसेच गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान इत्यादी एकही विषय दुसर्या विषयासंदर्भात एक वाक्य सांगू शकत नाहीत. फक्त अध्यात्मच विश्वातील सर्व विषयांच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना ‘मी करतो’, असा अहं बाळगण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते कार्य होणारच आहे; पण या कार्यात जे निःस्वार्थीपणे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा . त्यात अधिक आनंद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’
‘भारत ९०० वर्षे पारतंत्र्यात असल्याने हिंदूंच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जगल्या. आता मनातील गुलामगिरीचे विष नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणे आवश्यक आहे.