हिंदु राष्ट्र हे ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ असेल !

हिंदु राष्ट्र हे ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ असेल !

‘हिंदु राष्ट्रात जाती नसतील. त्यामुळे जातीमुळे आरक्षण मिळण्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. राष्ट्रहितासाठी सर्व जागा गुणांवरूनच भरण्यात येतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हेच आदर्श राष्ट्र !

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हेच आदर्श राष्ट्र !

‘अश्‍लील चित्रपट, ‘पब ’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांसारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. सध्याचे शासनकर्ते हे लक्षात घेऊन ‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का ? भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चारित्र्य संपन्नच असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्‍ट्रात ‘स्‍वभाषाभिमान बाळगणे’, हा धर्मच असेल !

हिंदु राष्‍ट्रात ‘स्‍वभाषाभिमान बाळगणे’, हा धर्मच असेल !

स्‍वभाषाभिमान हा राष्‍ट्राभिमानाचा पाया आहे. स्‍वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे हिंदूंचे स्‍वभाषाप्रेमासह राष्‍ट्र आणि धर्म प्रेमही नष्‍ट होत चालले आहे. शासनकर्त्‍यांच्‍या या राष्‍ट्रीय पातकाला देव क्षमा करणार नाही. – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी, सर्वधर्मसमभावी, साम्यवादी हेच देशाचे आणि धर्माचे खरे शत्रू !

बुद्धीप्रामाण्यवादी, सर्वधर्मसमभावी, साम्यवादी हेच देशाचे आणि धर्माचे खरे शत्रू !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली. सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत !

अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत !

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंभाव असलेले आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अहंभावशून्य भगवंत !

अहंभाव असलेले आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अहंभावशून्य भगवंत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वास्तविक ‘दूरदर्शीपणा’ !

वास्तविक ‘दूरदर्शीपणा’ !

‘स्वसुखासाठी दुसर्‍यांना दुःख देऊन धनाचा संग्रह करणे, हे पाप आहे; पण भविष्यकाळ लक्षात घेऊन त्यासाठी आपली उचित अशी तयारी योग्य प्रकारे करून ठेवणे याला ‘दूरदर्शीपणा’ म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना हे लज्जास्पद नव्हे का ?

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना हे लज्जास्पद नव्हे का ?

‘कुठे ʻविश्‍वचि माझे घर’, असा भाव असलेले संत, तर कुठे बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदूही आपले न वाटणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारत नेहमीच शत्रूंकडून मार खातो, यामागील कारण !

भारत नेहमीच शत्रूंकडून मार खातो, यामागील कारण !

‘पाकिस्तान्यांकडून वारंवार आक्रमणे होत असतांना ‘आक्रमण करणे’ हेच स्वरक्षणाचे सर्वोत्तम साधन आहे (Attack is the best policy of defence), हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकाही सरकारला ज्ञात नाही; म्हणून भारत आणि हिंदूही नेहमी शत्रूंकडून मार खातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान निरनिराळे ग्रह-तारे यांचा आकार, पृथ्वीपासूनचे अंतर इत्यादी माहिती सांगते, तर ज्योतिषशास्त्र ग्रह-तारे यांचा परिणाम आणि परिणाम वाईट होणार असल्यास त्यांवरील उपायही सांगते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले