पंढरपूर येथे एकादशीनिमित्त सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केला ‘निर्धार फाऊंडेशन’चा सन्मान !

कार्तिकी वारीच्या निमित्ताने निर्धार फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘सांगलीची स्वच्छतावारी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारी’ ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती.

कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न !

नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेच्या कालावधीत येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एकूण ३ कोटी २० लाख ५९ सहस्र ५४२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम् सुफलाम् कर !

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘अनेक आक्रमणे होत असतांनाही वारकर्‍यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पहाणार्‍याच्या डोळ्यांचे पारणे फिटते.

वारीच्या काळात मुबलक पाणी, तसेच अन्य सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ! – सुनील वाळुजकर, उपमुख्याधिकारी, नगर परिषद, पंढरपूर

कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेचे ३५० कर्मचारी आणि अन्य १ सहस्र कर्मचारी असे १ सहस्र ३५० हून अधिक कर्मचारी स्वच्छता, तसेच अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

Exclusive: चंद्रभागा नदीच्या परिसरातील घाटांवर काही ठिकाणी अस्वच्छता !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी आणि नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित असे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. वारकरी ज्या नदीला पवित्र समजून त्यात श्रद्धेने स्नान करतात, तसेच तिचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात, त्याच नदीच्या पाण्यात शहरातील लोक मोठ्या प्रमाणात म्हशींना आंघोळ घालतात.

कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणार्‍या दिंडीमध्ये चारचाकी वाहन घुसून ७ भाविकांना चिरडले !

मृत वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावाचे रहिवासी आहेत. ही दिंडी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पायी पंढरपूरकडे निघाली होती. घायाळ झालेल्या वारकर्‍यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

प्रशासकीय नियोजनशून्यतेमुळे वारकर्‍यांच्या पदरी उपेक्षाच !

आषाढी-कार्तिकी वारीच्या काळात विविध योजनांसाठी, वारकर्‍यांना सुविधा देण्यासाठी, तसेच वर्षभरही कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होतो; मात्र त्याचा वारकर्‍यांना प्रत्यक्ष लाभ किती होतो ?, याविषयी भलेमोठे प्रश्‍नचिन्हच आहे.

कार्तिक वारीच्या काळात वारकर्‍यांना दर्शनासाठी सर्व त्या सुविधा देण्याचा प्रयत्न ! – बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर

कार्तिक वारीच्या काळात मंदिर २४ घंटे वारकर्‍यांना दर्शनासाठी चालू ठेवलेले आहे, तसेच रांगेत असणार्‍या वारकर्‍यांना अल्पाहार आणि चहा देण्याचे आमचे नियोजन आहे. सध्या मुखदर्शन आणि चरणदर्शन घेणार्‍या वारकर्‍यांची संख्या लाखाच्या आसपास आहे.

कार्तिकीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे २४ घंटे दर्शन !

कार्तिकीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे दर्शन २८ ऑक्टोबरपासून २४ घंटे चालू ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. कार्तिक शुक्ल एकादशी सोहळा ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी होणार आहे. या कालावधीत दर्शनासाठी ८ ते १० लाख भाविक येतात.

पंढरपूर येथे विकासाचा सुधारित आराखडा सिद्ध करण्यासाठी ड्रोन छायाचित्रकाद्वारे चित्रीकरण !

श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ आणि मार्ग विकास आराखड्याच्या अंतर्गत भाविकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नव्याने समाविष्ट करण्याच्या कामांचा सुधारित सर्वंकष आराखडा सिद्ध करण्यात येत आहे.