भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे

भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे

स्वानुभवानेच अनुभवता येणार्‍या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या.

स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन होणे महत्त्वाचे !

स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन होणे महत्त्वाचे !

या सुकणार्‍या, नश्‍वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ?

चैतन्यमय वाणीतून साधकांवर प्रीतीचा वर्षाव करून त्यांच्याशी सहजतेने जवळीक साधणारे सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर !  

आज फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया या दिवशी पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच !

दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच !

‘दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच होय.’ भारतातील सोमनाथ आदि मंदिराचे भग्न अवशेष हे सौजन्य, शांती आणि क्षमा यांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम व्यक्त करतात. अतिरेकाचे आणि दुष्टांविषयी शांती दाखवल्याने त्यांचा स्वभाव, तर पालटणार नाहीच; पण त्यामुळे आत्मनाश होण्याची शक्यताच अधिक !

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांचे अवतारांच्या संदर्भात अनमोल मार्गदर्शन !

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांचे अवतारांच्या संदर्भात अनमोल मार्गदर्शन !

जगामध्ये पूर्वीपासूनच सत्य आणि असत्य यांची झुंज चालू आहे. खोटा आणि खरा असा वाद चालू आहे. खोटी नीती आणि खरी नीती, असेही चालू आहे; परंतु ईश्‍वर सत्याच्या बाजूला उभा असतो….

दुसर्‍यांना विचारून करण्याचे महत्त्व

दुसर्‍यांना विचारून करण्याचे महत्त्व

आपल्या वागण्याचे कोणते परिणाम होतील, यावर दूरदृष्टी ठेवून आपण आपले प्रत्येक कार्य केले पाहिजे. त्यासाठी एखादी गोष्ट स्वतःला समजली नाही, तर ती आपण दुसर्‍यांना विचारून समजून घेऊन करावी.

भागवतो नमः !

भागवतो नमः !

‘सर्व भूतांच्या ठिकाणी जो आपलेच भगवद्स्वरूप बघतो आणि भगवद्स्वरूप असणार्‍या आपल्या ठिकाणी जो सर्व भूतांचे दर्शन घेतो अन् ज्याला आपल्या ठिकाणी सर्व भूतांचा अंतर्भाव झालेला दिसतो, तोच भागवतो नमः।’

कुकर्म्यांना शिक्षा का करायची ? हेही ज्ञान नसलेले कलियुगातील शासनकर्ते !

कुकर्म्यांना शिक्षा का करायची ? हेही ज्ञान नसलेले कलियुगातील शासनकर्ते !

‘शुकदेव गोस्वामी महाराज परिक्षिताला सांगतात, ‘‘हे राजा, हे जग ३ प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सत्त्वगुण (चांगुलपणाने होणारी कृत्ये), रजोगुण (वासनांच्या आहारी जाऊन होणारी कृत्ये) आणि तमोगुण (अज्ञानामुळे होणारी कृत्ये).

विरक्त असलेल्याने जिभेचे चोचले न पुरवता जीभ आवरावी !

विरक्त असलेल्याने जिभेचे चोचले न पुरवता जीभ आवरावी !

जिव्हा आणि उपस्थ या दोन इंद्रियांचा कांंहीतरी विलक्षण प्रेमसंबंध आतून आहे. विष पिऊनही सुखाने असणारे ‘शंकर’ कुणी असतील, तर असोत. नियमाला अपवाद असतो, तरी पण प्राय: (प्रथमतः) असेच दिसून येते. निःस्पृहाने जिभलीचे (जिभेचे) चोचले पुरवत बसू नये.’

दान कसे असावे ?

दान कसे असावे ?

‘देश, काल आणि पात्र पाहून, तसेच सत्कारपूर्वक, शुद्ध बुद्धीपुरस्सर अन् प्रतिफळाची आशा न धरता दिलेले दानच खरे दान आणि तेच गृहस्थाचे मोठे तप होय.’