‘हिंदू एकता दिंडी’ने अमरावती येथे चेतवले हिंदुत्वाचे स्फुलिंग !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू एकता दिंडीमुळे शहरात वीरश्री निर्माण होऊन सर्वांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता.

सरकारने ‘ॲट्रॉसिटी’ कायदा रहित करावा ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, करणी सेना, महाराष्ट्र राज्य

श्री. सेंगर पुढे म्हणाले, ‘‘ॲट्रॉसिटी कायद्यामुळे जातीजातींमध्ये फूट पडली आहे. सरकार एकीकडे ‘जातीयवाद निर्माण करू नका’, असे आवाहन करते आणि दुसरीकडे ठराविक जातींसाठी वेगळे कायदे बनवते.

कोल्हापूरचे संजय पवार यांना शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी !

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या नावाची घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबई येथून केली आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.

कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाच्या आजारात बरे झालेले रुग्ण ९८ टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

पेंटाग्राफमधील ‘स्पार्क’मुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत !

पावसाच्या हलक्या सरींमुळे हार्बर मार्गावर पेंटाग्राफमध्ये ‘स्पार्क’ झाल्याने २४ मे या दिवशी सकाळी लोकल वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सर्व हिंदू संघटित झाल्यास ईश्वरी राज्य येईल ! – पू. भागिरथी महाराज, संस्थापक अध्यक्ष, गुरुकृपा सेवाश्रम

हिंदूंच्या संघटनाअभावी हिंदूंवर आघात होत आहेत. त्यामुळे जेव्हा सर्व जण हिंदू म्हणून संघटित होतील, तेव्हाच ईश्वरी राज्य येईल, असे प्रतिपादन बेलतरोडीच्या गुरुकृपा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पू. भागिरथी महाराज यांनी केले.

बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही ! – ब्राह्मण महासंघाचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ‘ब्राह्मणांना आरक्षण हवे’, हे सूत्रच आले नाही. यासंबंधी सर्व ठिकाणी विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘कुणालाच आरक्षण नको’, अशी काही जणांची भूमिका होती…

अडीच वर्षांच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, भाजप

अडीच वर्षांच्या कालावधीत महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या समस्या यांसह सर्वच आघाड्यांवर  महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलेले आहे. या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पहाण्यास वेळ नसून हे सरकार स्थानांतरण आणि वसुली यातच मग्न आहे…

सातारा येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेचा निग्रह !

छत्रपती शिवराय आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये २४ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ चैतन्यमय वातावरणात पार पडली.

१३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित !

महापालिकांची आरक्षणाची सोडत ३१ मे या दिवशी काढण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याच्या निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील १३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे