पबजीच्या आहारी गेल्याने आंध्रप्रदेशातील १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

पबजी या खेळाच्या आहारी गेल्याने खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होऊन एका १६ वर्षीय मुलाला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशमध्ये घडली आहे. सतत खेळल्याने त्याच्या मेंदूवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले.

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १ फूट ९ इंचाने उघडले

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १ फूट ९ इंचाने उघडण्यात आले असून १० सहस्र ४१० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात चालू झाला आहे.

नेपाळच्या भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याची घटना उघड करणार्‍या नेपाळी पत्रकाराचा रहस्यमयरित्या मृत्यू

नेपाळमधील ज्येष्ठ पत्रकार बलराम बनिया यांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला आहे. ते येथील ‘कांतीपूर डेली’ नावाच्या दैनिकाचे साहाय्यक संपादक होते. १० ऑगस्ट या दिवशी ते अचानक बेपत्ता झाले आणि १२ ऑगस्टला त्यांचा मृतदेह नदीच्या किनारी सापडला.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सौ. विजया दिलीप कळसकर यांचा मुलगा विश्‍वजीत दिलीप कळसकर (वय २७ वर्षे) यांचे हृदयविकाराने ५ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

बागपत (उत्तरप्रदेश) येथील भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

बागपत (उत्तरप्रदेश) येथे सकाळी बाहेर चालण्यासाठी गेलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय खोखर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. आक्रमण करणारे तिघे जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

अमेरिकेत शिक्षण घेणारी आणि सध्या घरी आलेली येथील सुदीक्षा भाटी हिचा टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. गरीब कुटुंबातील असलेल्या सुदीक्षा हिने अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळवली होती आणि तेथे ती शिकत होती.

वर्ष २००५ नंतर जन्म झालेल्या मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट या दिवशी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये ‘वर्ष २००५ नंतर जन्म झालेल्या मुलींनाही वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे समान वाटा देण्यात यावा’, असे सांगितले.

सावंतवाडी शहरात आज दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार

सावंतवाडी शहरात प्रतीवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. विविध मंडळांच्या माध्यमातून शहरात २० हून अधिक हड्या बांधल्या जातात; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने १२ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.

हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची स्थापना

हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय विद्यालय मांडवीचे प्राचार्य रवि प्रताप सिंह यांची, तर दाबोळी येथील स्पेक्ट्रम करिअर अकादमीचे निर्देशक डॉ. कमलेश मिश्रा यांची सरचिटणीसपदी निवड झालेली आहे.