स्वार्थांधतेची परिसीमा !

एखाद्या संकटात संपूर्ण जगच होरपळून निघत असेल, तेव्हा अशा संकटकाळातही काही भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा आर्थिक लाभासाठी खालच्या पातळीला जातात, अशा वेळी सामान्य माणसाचे मन अस्वस्थ होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ?

गेल्या काही वर्षांपासून देशात जो तो उठतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची आरोळी ठोकतो. अशी आवई उठवणार्‍यांवर सरकारने वेळीच कारवाई करायला हवी. अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रपोगंडा देशहितासाठी बाधक ठरू शकतो !

सीमावादाचा चिघळलेला प्रश्‍न !

जेव्हा एखादा प्रश्‍न सुटत नाही, तेव्हा पालक या नात्याने त्याचे दायित्व केंद्र सरकारकडेच येते. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी नरो वा कुंजरोवा अशी भूमिका न घेता पुढाकार घेऊन येथील मराठीजनांना दिलासा द्यावा, इतकीच सामान्य मराठीजनांची अपेक्षा आहे.

रिक्त पदे कधी भरणार ?

कृषी विभागातील रिक्त पदे भरण्याचे दायित्वही शासनाचेच आहे. एकीकडे शासन ‘डिजिटल’ भारत करण्याच्या प्रयत्नांत आहे; मात्र शेतकर्‍यांपर्यंत योजनाच पोचल्या नाहीत किंवा कार्यालयात संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्यास ‘डिजिटल’ हे केवळ स्वप्नच राहील.    

गोव्यातही लव्ह जिहाद

केरळ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यांमधून लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आली. त्यानंतर हिंदु मुलींच्या सुरक्षेसाठी उत्तरप्रदेशसह काही राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात कडक कायदे केले. लव्ह जिहादचे असे प्रकार आता शांतताप्रिय गोव्यातही समोर येऊ लागले आहेत.

सोयीस्कर अभिव्यक्ती स्वातंत्र्य !

कोणते कपडे घालायचे, याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असते; म्हणून कुणी नग्न फिरायला लागला, तर त्याला निर्लज्जपणा किंवा स्वैराचार म्हणतात. याचे भान लहान मुलालाही असते. संस्कृती, सभ्यता, पावित्र्य या शब्दांपर्यंत जाण्याची कुवत नसल्यामुळे तृप्ती देसाई यांना एवढे कळले, तरी पुरेसे आहे.

आमदारकी रहित होणार ?

खुलेपणाने दुसर्‍या महिलेसमवेतच संबंधांविषयी समर्थन करून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला मान्यता देणार्‍या अनैतिक धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काढून घेतात का ? याकडेही महाराष्ट्रवासियांचे लक्ष आहे !

कोरोनाचे दूरगामी परिणाम…!

मानसिक स्वास्थ्य कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवण्यासाठी मनोविकारतज्ञ काही सूचना देणे, मार्गदर्शन करणे इत्यादी करू शकतात; मात्र या सर्वांवर एकमेव परिणामकारक उपाय आहे आणि तो म्हणजे जीवनाकडे सकारात्मकतेने पाहून मनोबल उंचावण्यासाठी काळानुसार साधना करून आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे.

वाढती लाचखोरी : कठोर उपाययोजना कधी ?

राज्यात विविध न्यायालयांत चालू असलेले लाचखोरी आणि इतर भ्रष्टाचाराचे ९३ खटले या वर्षात निकाली निघाले; मात्र यातील केवळ ९ गुन्ह्यांतच १३ आरोपींना शिक्षा झाली. इतक्या अल्प प्रमाणात जर शिक्षा होत असेल, तर शिक्षेचा धाक कसा रहाणार ?

गर्भारपणाचा बाजार !

सध्या गर्भवती असलेल्या अभिनेत्रींची छायाचित्रे सामाजिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होण्याची नवरूढी निर्माण झाली आहे. प्रसिद्धीमाध्यमेही त्याला बिनधोक प्रसिद्धी देऊन त्यांच्यातील स्पर्धा सांभाळत असतात.