२ सहस्र ३८६ गावांत ‘बी.एस्.एन्.एल्.’ मनोरे उभारण्यासाठी राज्यशासन विनामूल्य भूमी देणार !
ग्रामीण भागांत ‘४ जी इंटरनेट’ची सेवा पोचावी, यासाठी राज्यातील २ सहस्र ३८६ गावांत भारत सेवा संचार निगम (बी.एस्.एन्.एल्.) चे मनोरे उभारण्यासाठी २०० चौरस मीटर जागा विनामूल्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.