अयोध्येत ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारावे !
अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
वसईतील रहिवासी श्रद्धा वालकर यांच्या निर्दयी हत्येच्या प्रकरणात आरोपी आफताब तिचे धर्मांतर करू इच्छित होता का ? श्रद्धाने त्याला नकार दिला का ? आणि हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे का ?
गटविकास अधिकारी कार्यालयातील टँकरचे प्रत्येक देयक पडताळले जाईल. प्रत्येक टँकर किती किलोमीटर चालेल ? कोणत्या गावात किती वाजता पोचेल ? कशाच्या आधारावर देयक निघाले ? याची पडताळणी होईल – पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
१६ नोव्हेंबर या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास अन् रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
ठाणे येथे शिंदे गटाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चपला मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार महेश वसेकर आणि पोलीस शिपाई रवी विशे यांना चरसविक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला आहे.
पुणे शहरातील नदी स्वच्छ करण्यासाठी आणि मैलापाण्याची समस्या सोडवण्यासाठी ‘मुळामुठा नदी सुधार प्रकल्पा’चे (जायका प्रकल्प) काम ६ वर्षांनी चालू झाले आहे; परंतु सिद्ध केलेल्या कक्षातील अभियंत्यांचे स्थानांतर झाल्यावर तेथे नवे अधिकारी नियुक्त केले नाहीत.
कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही मासांपासून सोनसाखळी चोरी आणि घरफोडी यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या हे प्रकार होत आहेत. त्यामुळे ‘पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारीवर वचक बसवावा’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणार्यांना, तसेच घाण करणार्या पाळीव कुत्र्यांच्या मालकांकडून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने आता शहरातील मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा उचलण्याचा व्यय संबंधित भूखंड मालकांकडून वसूल केला जाणार आहे.
कल्याण येथील वालधुनी नदीपात्रात रासायनिक द्रव्य सोडणारा टँकरचालक नजीर मोहम्मद शमीउल्ला अन्सारी याला पोलिसांनी कह्यात घेतले आणि टँकर जप्त केला आहे. रासायनिक द्रव्ये असलेला टँकर रात्री २ वाजता नदीपात्रात रिता केला जात असल्याची माहिती पर्यावरणप्रेमींना मिळाली.