हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांचे विधान

चंडीगड – श्रीलंका आणि बांगलादेश येथील तरुणांनी सरकारला देश सोडण्यास भाग पाडले. नेपाळमधील तरुणांनीही हाच कित्ता गिरवला आणि सरकार उलथवून लावले. अशाच प्रकारची रणनीती भारतात आखून विद्यमान सरकार उलथवून लावण्याची आवश्यकता आहे, असे चिथावणीखोर विधान हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांनी केले. चौटाला यांचा हरियाणातील एका कार्यक्रमा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात त्यांनी वरील हे विधान केले आहे.
🚨 Call for Chaos, Not Democracy! 🇮🇳
“Like Sri Lanka & Bangladesh, India needs an agitation to overthrow the govt” – Abhay Singh Chautala (INLD).
This is a direct threat to India’s constitutional order & democracy, says BJP.
🛑 Free speech cannot be a shield for anti-national… pic.twitter.com/ePF7pyQ3pw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 4, 2026
हे विधान भारताची राज्यघटनात्मक व्यवस्था आणि लोकशाही नियम यांसाठी धोका ! – भाजप

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी चौटाला यांच्या विधानाचा विरोध करतांना म्हटले की, हे विधान भारताची राज्यघटनात्मक व्यवस्था आणि लोकशाही नियम यांसाठी धोका आहे. हे विधान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या विरोधातील कृत्य आहे. राष्ट्रीय हितापेक्षाही स्वतःच्या हिताला काही लोक प्राधान्य देत आहेत.
संपादकीय भूमिकाअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देशद्रोही विधान करणार्यांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !