‘श्रीलंका आणि बांगलादेश प्रमाणे भारतातील सरकारही उलथवून टाकण्यासाठी आंदोलनाची आवश्यकता !’ – Abhay Singh Chautala

हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांचे विधान

इंडियन नॅशनल लोक दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय सिंह चौटाला

चंडीगड – श्रीलंका आणि बांगलादेश येथील तरुणांनी सरकारला देश सोडण्यास भाग पाडले. नेपाळमधील तरुणांनीही हाच कित्ता गिरवला आणि सरकार उलथवून लावले. अशाच प्रकारची रणनीती भारतात आखून विद्यमान सरकार उलथवून लावण्याची आवश्यकता आहे, असे चिथावणीखोर विधान हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांनी केले. चौटाला यांचा हरियाणातील एका कार्यक्रमा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात त्यांनी वरील हे विधान केले आहे.

हे विधान भारताची राज्यघटनात्मक व्यवस्था आणि लोकशाही नियम यांसाठी धोका ! – भाजप

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी चौटाला यांच्या विधानाचा विरोध करतांना म्हटले की, हे विधान भारताची राज्यघटनात्मक व्यवस्था आणि लोकशाही नियम यांसाठी धोका आहे. हे विधान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या विरोधातील कृत्य आहे. राष्ट्रीय हितापेक्षाही स्वतःच्या हिताला काही लोक प्राधान्य देत आहेत.

संपादकीय भूमिका

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देशद्रोही विधान करणार्‍यांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !