(म्हणे) ‘मुसलमानांनी संयम सोडला, तर क्षणात देशात दंगली होतील !’ – Maulana Sajid Rashidi

बांगलादेशी खेळाडूला होणार्‍या विरोधावर मौलाना साजिद रशिदी यांचे वक्तव्य

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

शाहरुख खान (डावीकडे), मौलाना साजिद रशिदी (उजवीकडे) बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमान (वर्तुळात)

नवी देहली : राज्यघटना न समजता विरोध करण्याची काही जणांना सवय झाली आहे. जिथे मुसलमान नाव ऐकू येते तिथे विरोध करणे सोपे होते. शाहरुख खान मुसलमान, बांगलादेशी खेळाडू मुसलमान; मग विरोध तर होणारच. मुसलमानांच्या विरोधातील द्वेष त्यामुळे उघड होतो. जे लोक मुसलमानांच्या विरोधात बोलतात, तेच आता शाहरुख खान यांच्या निर्णयावर प्रश्न उभे करत आहेत. असे लोक धर्माच्या नावाखाली वैमनस्य पसरवतात. मुसलमानांनी संयम सोडला, तर देशात एका क्षणात दंगली भडकू शकतात, अशी धमकी ‘अखिल भारतीय इमाम संघटने’चे (‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे) अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी दिली. इंडियन प्रिमियर लिग (आय.पी.एल्.) क्रिकेट स्पर्धेत शाहरुख खान यांच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने लिलावात घेतलेल्या बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमान याला विरोध होत आहे. त्यावरून रशिदी यांनी वरील विधान केले.

रशिदी यांनी प्रश्न उपस्थित केला की,

क्रिकेट संघ शाहरुख खान यांचा आहे. ते कुणाला खेळवतात किंवा नाही, याचा इतरांना काय संबंध ? राज्यघटनाविरोधी काही असेल, तर सरकार कारवाई करेल. विरोध करणार्‍यांची पात्रता काय ? (राज्यघटनेच्या नावाखाली सर्व प्रकारचे राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी कृत्ये करण्याचा प्रयत्न करणारे धर्मांध मुसलमान आणि त्यांचे धर्मगुरू ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • भारतात दंगली धर्मांधांकडूनच नेहमी केल्या जातात, हेच मौलाना रशिदी सांगत आहेत. मुसलमान केव्हाच संयम बागळत नाहीत, हे नेहमीच ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेद करण्याच्या) घोषणा देऊन देशात अशांती पसरवतात. अशा मानसिकतेच्या लोकांसमवेत हिंदू कधीही सर्वधर्मसमभावाने राहू शकत नाहीत, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला पाहिजे !
  • अशा प्रकारची विधाने करणार्‍या मौलानांवर गुन्हे नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !