No crash in Taiwan : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता ! – उपराष्ट्रपती

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन्

रामनाथपूरम् (तमिळनाडू) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू वर्ष १९४५ मधील विमान अपघातात झाला नव्हता, असे विधान भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन् यांनी ३१ ऑक्टोबरला केले. रामनाथपूरमजवळ पासुमपोन येथे स्वातंत्र्यसैनिक मुथुरामलिंगा थेवर यांची ११८ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राधाकृष्णन पुढे म्हणाले,

‘‘माझ्याकडे ठोस पुरावे नाहीत; पण माझा ठाम विश्वास आहे की, नेताजींचा मृत्यू त्या दुर्घटनेत झाला नाही. स्वतः नेताजींचे अनुयायी असलेले थेवर यांनी हे सांगितले होते आणि मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. थेवर हे आयुष्यात कधीही असत्य बोलले नाहीत.

स्वातंत्र्यलढ्यात थेवर यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून पंतप्रधान नेहरू त्यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते; पण त्यांनी त्यास नकार दिला. ‘नेताजींना न्याय मिळावा’, हेच त्यांचे एकमेव ध्येय होते.’’

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वतः नेताजींचे अनुयायी असलेले एम. थेवर