वाराणसी येथील ‘सनातन प्रभात’ च्या वाचकांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा प्रसाद देतांना त्यांना आलेली अनुभूती आणि त्यांनी दिलेले अभिप्राय

१. श्री. बच्चेलाल गुप्ता, वाराणसी

१ अ. प्रसादातून दैवी सुगंध येणे : श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘सनातन प्रभात’ चा अंक देण्यास आलेले साधक प्रसादाचे महत्त्व सांगून मला प्रसाद देत होते. तेव्हा मी भावपूर्ण प्रार्थना केली. त्या वेळी मला प्रसादातून एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आला. मी असा दैवी सुगंध पहिल्यांदाच अनुभवला. यासाठी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’’

२. श्री. अविनाश गुप्ता, वाराणसी 

अ. प्रसाद दिल्यावर श्री. अविनाश गुप्ता यांनी अतिशय विनम्रतेने सांगितले, ‘‘सनातन संस्था करत असलेले कार्य अद्वितीय आहे. याचे नियोजन कसे केले असावे ?’’

(सर्व सूत्रांचा दिनांक २६.६.२०२५)    

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक