सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 १. देवासुर संग्रामाचा परिणाम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांवर होणे

‘पूर्वी देवासुर संग्राम शक्तीच्या स्तरावर होत होता. देवी या शक्तीस्वरूपिणी असल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवींच्या चित्रांमध्ये अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येत होते. आता देवासुर संग्राम चैतन्याच्या स्तरावर होत आहे. देव हे चैतन्यस्वरूप असल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येत आहे.

२. काळानुसार कर्मकांडांतर्गत देवींची आणि उपासनाकांडांर्तगत देवांची उपासना अधिक प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांवर होणे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

सध्या रामराज्याच्या स्थापनेतील विविध अडथळे दूर होण्यासाठी सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे विविध प्रकारच्या ‘दशमहाविद्या आणि देवी’ यांचे यज्ञयाग करण्याविषयी सांगितले जाते. त्यानुसार यज्ञयागाला सनातन संस्थेतील मोक्षगुरु श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि मोक्षगुरु श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभते. यज्ञयागाचा परिणाम सगुण स्तरावर अधिक प्रमाणात होऊन सनातनच्या साधकांना होणारे विविध प्रकारचे शारीरिक त्रास न्यून होत आहेत. सध्या संपूर्ण विश्वात रामराज्याच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर होण्यासाठी ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा नामजप सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘श्रीराम जय राम जय जय राम । ’ हा नामजप अधिकाधिक करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सध्या सनातन संस्थेतील साधकांकडून देवीची उपासना कर्मकांडानुसार आणि देवांची उपासना उपासनाकांडानुसार चालू आहे. कर्मकांडापेक्षा उपासनाकांड अधिक सूक्ष्म असल्यामुळे त्याचे परिणाम देवीपेक्षा देवांच्या चित्रांवर अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ईश्वरी चैतन्य देवीच्या चित्रांपेक्षा देवांच्या चित्रांतून अधिक प्रमाणात प्रगट झाल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येत आहे.

‘देव आणि देवी यांचे काळानुसार समष्टीच्या कल्याणाचे कार्य कसे चालू असते’, याची प्रचीती वरील सूत्रांवरून येते.’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखनाचा दिनांक : २०.५.२०२६ आणि वेळ : सायंकाळी ५.२० ते ५.३५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.