
१. देवीला प्रार्थना केल्यावर यज्ञाच्या वेळी होणारे त्रास न्यून होऊन चैतन्य ग्रहण करता येणे
‘१०.१.२०२१ या दिवशी बगलामुखी यज्ञ चालू झाल्यावर माझ्या हाता-पायाच्या तळव्यांत आणि डोळ्यांत उष्णता निर्माण झाली. त्या वेळी मी देवीला प्रार्थना केली, ‘मला वेगवेगळ्या ठिकाणी त्रास होत आहेत, त्याचे तू निवारण कर. मला यज्ञातील चैतन्य ग्रहण करतायेऊ दे.’ त्यानंतर १० मिनिटांनी माझी सर्व उष्णता हळूहळू न्यून होत गेली आणि मला शांतपणे यज्ञातील चैतन्य ग्रहण करता आले.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आरती करत असतांना देवीचे दहा हात दिसू लागणे, सूक्ष्म परीक्षण करणार्या कु. मधुराताईंना याचे कारण विचारताच ‘देवी तारक-मारक शक्ती देत आहे’, असे त्यांनी सांगणे
११.१.२०२१ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आरती करत असतांना यज्ञाच्या वेळी देवीचे दहा हात दिसले. तेव्हा मी कु. मधुरा भोसले यांना ही अनुभूती सांगितली. मधुराताई म्हणाली, ‘‘आज बगलामुखीदेवी पुष्कळ युद्ध करत आहे; म्हणून तुम्हाला अशी अनुभूती आली. देवी तारक-मारक शक्ती देत आहे.’’
३. १३.१.२०२१ या दिवशी सद्गुरु गाडगीळकाका तुपाची आहुती देत असतांना तुपाच्या पात्रात मोठी काळी बाहुली दिसली आणि यज्ञकुंडात काळे साप अन् प्राणी यांची आकृती दिसली.
४. यज्ञ चालू असतांना इतर वेळी पू. वामन शांत बसत असले, तरी आज ते संत बसले होते, तिकडे ये-जा करत असल्यामुळे वातावरणात आनंद जाणवणे, तसेच प.पू. दास महाराज आल्यामुळे अधिक प्रमाणात शक्ती जाणवणे
१४.१.२०२१ या दिवशी यज्ञाच्या ठिकाणी पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर) आले होते. ते नेहमी एकाच जागेवर शांत बसलेले असतात; पण आज ते इकडे तिकडे आणि संत बसलेले होते तिकडे ये-जा करत होते. त्यामुळे ‘वातावरणात आनंद’ जाणवत होता. तसेच प.पू. दास महाराज यज्ञाच्या ठिकाणी आले होते, तेव्हा पुष्कळ प्रमाणात शक्ती जाणवत होती. ते पू. वामन यांच्याशी बोलत होते, त्या वेळी माझ्याकडे बघून त्यांनी स्मित हास्य केले.’
– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !