
१. देवीला प्रार्थना केल्यावर यज्ञाच्या वेळी होणारे त्रास न्यून होऊन चैतन्य ग्रहण करता येणे
‘१०.१.२०२१ या दिवशी बगलामुखी यज्ञ चालू झाल्यावर माझ्या हाता-पायाच्या तळव्यांत आणि डोळ्यांत उष्णता निर्माण झाली. त्या वेळी मी देवीला प्रार्थना केली, ‘मला वेगवेगळ्या ठिकाणी त्रास होत आहेत, त्याचे तू निवारण कर. मला यज्ञातील चैतन्य ग्रहण करतायेऊ दे.’ त्यानंतर १० मिनिटांनी माझी सर्व उष्णता हळूहळू न्यून होत गेली आणि मला शांतपणे यज्ञातील चैतन्य ग्रहण करता आले.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आरती करत असतांना देवीचे दहा हात दिसू लागणे, सूक्ष्म परीक्षण करणार्या कु. मधुराताईंना याचे कारण विचारताच ‘देवी तारक-मारक शक्ती देत आहे’, असे त्यांनी सांगणे
११.१.२०२१ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आरती करत असतांना यज्ञाच्या वेळी देवीचे दहा हात दिसले. तेव्हा मी कु. मधुरा भोसले यांना ही अनुभूती सांगितली. मधुराताई म्हणाली, ‘‘आज बगलामुखीदेवी पुष्कळ युद्ध करत आहे; म्हणून तुम्हाला अशी अनुभूती आली. देवी तारक-मारक शक्ती देत आहे.’’
३. १३.१.२०२१ या दिवशी सद्गुरु गाडगीळकाका तुपाची आहुती देत असतांना तुपाच्या पात्रात मोठी काळी बाहुली दिसली आणि यज्ञकुंडात काळे साप अन् प्राणी यांची आकृती दिसली.
४. यज्ञ चालू असतांना इतर वेळी पू. वामन शांत बसत असले, तरी आज ते संत बसले होते, तिकडे ये-जा करत असल्यामुळे वातावरणात आनंद जाणवणे, तसेच प.पू. दास महाराज आल्यामुळे अधिक प्रमाणात शक्ती जाणवणे
१४.१.२०२१ या दिवशी यज्ञाच्या ठिकाणी पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर) आले होते. ते नेहमी एकाच जागेवर शांत बसलेले असतात; पण आज ते इकडे तिकडे आणि संत बसलेले होते तिकडे ये-जा करत होते. त्यामुळे ‘वातावरणात आनंद’ जाणवत होता. तसेच प.पू. दास महाराज यज्ञाच्या ठिकाणी आले होते, तेव्हा पुष्कळ प्रमाणात शक्ती जाणवत होती. ते पू. वामन यांच्याशी बोलत होते, त्या वेळी माझ्याकडे बघून त्यांनी स्मित हास्य केले.’
– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !