Prof Vimal Thorat : (म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा आग्रह म्हणजे महिलांना गुलामगिरीत ढकलण्याचे षड्यंत्र !’

‘जेएनयू’च्या प्रा. डॉ. विमल थोरात यांना हिंदु राष्ट्राविषयी उठला पोटशूळ !

प्रा. डॉ. विमल थोरात

नागपूर – देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असून हा आग्रह म्हणजे भारतीय महिलांना पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे षड्यंत्र होय, असे विधान ‘जेएनयू’च्या (जवाहरलाल नेहरु विश्‍वविद्यालयाच्या) प्रा. डॉ. विमल थोरात यांनी केले. त्या येथे झालेल्या जागतिक रिपब्लिकन महिला परिषदेत बोलत होत्या.

थोरात पुढे म्हणाल्या की, शिक्षणाखेरीज दुसरे मौलिक धन नाही. मागासवर्गीय समाजाच्या शिक्षणात गळती दिसून येत आहे. महिलांविषयीचा तिरस्कार अल्प झालेला नाही. (लोकशाही असलेल्या भारतात महिलांविषयीचा तिरस्कार अल्प झालेला नसल्याने उद्या थोरात यांनी ‘लोकशाहीऐवजी साम्यवादाचे राज्य यावे’, अशी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘हिंदु राष्ट्रा’वर आकस असणार्‍या थोरात वर्ष २०४७ पर्यंत भारताला मुसलमान राष्ट्र करू पहाणार्‍यांच्या विरोधात चकार शब्दही बोलत नाहीत. यातून थोरात यांना महिलांचे हित जोपासण्यापेक्षा हिंदुद्वेषाची री ओढायची आहे, हे जाणा !
  • महिलांच्या अधिकारांचा पुळका असलेल्या थोरात ‘हलाला’, तिहेरी तलाक, लव्ह जिहाद यांसारख्या कुप्रथा अथवा षड्यंत्रे यांच्या विरोधात कधीच का बोलत नाहीत ?