पुरी पीठाचे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे मार्गदर्शन

नवी देहली – भारताचा विकास झाला पाहिजे; पण तो मानवजातीच्या हिताचा असला पाहिजे. भारताच्या विकासात ‘भारतीयत्व सर्वोपरि’ असले पाहिजे. उपजीविका ही जीवनासाठी असली पाहिजे; पण जीवन उपजीविका बनू नये, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. केवळ पोट आणि कुटुंब यांपुरते मर्यादित राहू नका, देशाच्या विकासात अन् धर्म आणि अध्यात्म यांच्या उन्नतीत योगदान द्या, असे मार्गदर्शन पुरी पीठाचे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले. त्यांचा ८३ वा जयंती महोत्सव येथे नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.

शंकराचार्यांच्या मंगलमय उपस्थितीत ‘राष्ट्रोत्कर्ष दिना’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी देहलीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजप खासदार संबित पात्रा, माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम् स्वामी, प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर आदी उपस्थित होते.

शंकराचार्य पुढे म्हणाले की, कोणत्याही समाजाच्या विकासासाठी सरकारवर पूर्णपणे अवलंबून रहाणे योग्य नाही. जर सनातन धर्म टिकला, तर मानवांचे कल्याण होईल, जगात शांती येईल, भारत पुन्हा जागतिक नेता होईल. भारतात निःपक्षपाती सनातन धर्म व्यवस्था कशी स्थापित करायची ?, याविषयी सर्वांमध्ये जागृती करावी लागेल.
| श्रीमदजगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज के 83वें प्राकट्योत्स्व “
(सौजन्य : Govardhan Math, Puri) |

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !