Pakistan Terrorist Bases Repair : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे उद्ध्वस्त केलेल्या आतंकवाद्यांच्या तळांच्या दुरुस्तीसाठी पाक सैन्य ४० कोटी रुपये खर्च करणार  

पाक सैन्याचे फील्ड मार्शल असीम मुनीर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताने पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकमधील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनांचे ९ तळ उद्ध्वस्त केले होते. आता हे तळ पुन्हा उभारण्यासाठी पाकच्या सैन्याने ४० कोटी रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तान स्वतःच्या आतंकवादाला पुनरुज्जीवित करत आहे.

१. पाक सैन्याचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी स्वतः हस्तक्षेप करत हा सरकारी निधी दिला आहे. विशेष म्हणजे हा निधी या आतंकवादी संघटनांशी थेट संबंध असलेले मदरसे आणि मशिदी यांनाही मिळणार आहे.

२. या तळांच्या दुरुस्तीसाठी ३१ जून ही अंतिम समयमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.  फील्ड मार्शल मुनीर यांनी या तळांची दुरुस्ती करण्यासाठी एक पथक सिद्ध केले आहे. मुनीर स्वतः या कामांवर लक्ष ठेवत आहेत.

३. या तळांवरील मदरसे २० जूनपासून उघडणार होते; परंतु त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे १ जुलैला ते उघडण्यात येणार आहेत.

संपादकीय भूमिका

  • यावरून हे स्पष्ट होते की, पाकचे सैन्यच आतंकवाद्यांना पोसत असून ते भारताविरोधी कारवाया करत आहे !
  • यावरून ‘केवळ आतंकवाद्यांची तळे उद्ध्वस्त करून पाकपुरस्कृत आतंकवाद थांबणार नाही, तर पाकचे सैन्य आणि तेथील जिहादी मानसिकता नष्ट करणे आवश्यक आहे’, हे स्पष्ट होते. हे धाडस भारताने आता दाखवले पाहिजे !