Pakistan Deputy PM Admission : भारताने पाकचे वायूदलाचे तळ उद्ध्वस्त केले !

  • पाकच्या उपपंतप्रधानांची प्रथमच स्वीकृती

  • सौदी अरेबियाच्या राजकुमारांनी भारताशी बोलून युद्धविराम करण्यास साहाय्य केल्याचीही दिली माहिती

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आम्ही पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी बोललो होतो. त्यांनी सैन्याला सिद्ध रहाण्यास सांगितले होते. आम्ही काय करायचे आहे ?, याविषयी सर्व काही ठरले होते. आम्ही ६-७ मे च्या रात्री भारताला प्रत्युत्तर देण्याची सिद्धता करत होतो, त्याच वेळी भारताने पुन्हा आक्रमण केले आणि नूर खान अन् शोरकोट येथील वायूदलाच्या तळ उध्वस्त केले, अशी स्वीकृती पाकचे पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी प्रथमच दिली. ते ‘जिओ न्यूज’ वाहिनीवर बोलत होते. यापूर्वी पाक सरकार आणि पाकचे सैन्य यांनी भारताच्या आक्रमणाचे वृत्त फेटाळले होते.

इसाक डार पुढे म्हणाले की, ६-७ मे च्या रात्री आक्रमणानंतर ४५ मिनिटांनी सौदी अरेबियाचे राजकुमार सलमान यांनी दूरभाष करून सांगितले की, जर तुम्ही म्हणत असाल, तर मी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्याशी बोलीन आणि त्यांना ‘पाकिस्तान युद्धबंदीसाठी सिद्ध आहे आणि तुम्हीही थांबावे’, असे सांगीन. त्यावर मी त्यांना ‘हो, तुम्ही निश्चितच असे त्यांच्याशी बोला’, असे सांगितले. यानंतर प्रिन्स यांनी जयशंकर यांच्याशी बोलून मला दूरभाष केला.