|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आम्ही पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी बोललो होतो. त्यांनी सैन्याला सिद्ध रहाण्यास सांगितले होते. आम्ही काय करायचे आहे ?, याविषयी सर्व काही ठरले होते. आम्ही ६-७ मे च्या रात्री भारताला प्रत्युत्तर देण्याची सिद्धता करत होतो, त्याच वेळी भारताने पुन्हा आक्रमण केले आणि नूर खान अन् शोरकोट येथील वायूदलाच्या तळ उध्वस्त केले, अशी स्वीकृती पाकचे पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी प्रथमच दिली. ते ‘जिओ न्यूज’ वाहिनीवर बोलत होते. यापूर्वी पाक सरकार आणि पाकचे सैन्य यांनी भारताच्या आक्रमणाचे वृत्त फेटाळले होते.
💥 BIG Admission from Pakistan’s Deputy PM!
🇮🇳 India destroyed Pakistan’s Air Force bases — officially acknowledged for the first time!
🛑 He also revealed that Saudi Crown Prince had to step in and broker a ceasefire between the two nations.
How long will Pakistan hide its… pic.twitter.com/kqzA3ODEzT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 20, 2025
इसाक डार पुढे म्हणाले की, ६-७ मे च्या रात्री आक्रमणानंतर ४५ मिनिटांनी सौदी अरेबियाचे राजकुमार सलमान यांनी दूरभाष करून सांगितले की, जर तुम्ही म्हणत असाल, तर मी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्याशी बोलीन आणि त्यांना ‘पाकिस्तान युद्धबंदीसाठी सिद्ध आहे आणि तुम्हीही थांबावे’, असे सांगीन. त्यावर मी त्यांना ‘हो, तुम्ही निश्चितच असे त्यांच्याशी बोला’, असे सांगितले. यानंतर प्रिन्स यांनी जयशंकर यांच्याशी बोलून मला दूरभाष केला.
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !