भारताच्या कारवाईत मसूद अझहरचे १४ नातेवाईक झाले होते ठार !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचे कुटुंब ठार झाले आहे. पाक सरकार त्याला साहाय्य म्हणून सरकारी निधीतून एकूण १४ कोटी रुपये देणार आहे. मसूदच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक मृत्यूसाठी १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने भरपाई घोषित केली आहे. पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे जैशने मुख्यालय होते, जे भारताने उद्ध्वस्त केले. येथेच मसूदचे नातेवाईक रहात होते.
संपादकीय भूमिकापाकिस्तान आतंकवाद्यांना पोसतो आणि ठार झाल्यानंतरही त्याच्या नातेवाइकांना हानीभरपाई देतो, हे यातून उघड झाले आहे. असे असतांनाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकला २० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य देते, हे आश्चर्यजनक आहे. भारताने यावरून आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला जाब विचारला पाहिजे ! |
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया