Masood Azhar : पाकिस्तान सरकार आतंकवादी मसूद अझहर याला १४ कोटी रुपयांची हानीभरपाई देणार

भारताच्या कारवाईत मसूद अझहरचे १४ नातेवाईक झाले होते ठार !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचे कुटुंब ठार झाले आहे. पाक सरकार त्याला साहाय्य म्हणून सरकारी निधीतून एकूण १४ कोटी रुपये देणार आहे. मसूदच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक मृत्यूसाठी १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने भरपाई घोषित केली आहे. पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे जैशने मुख्यालय होते, जे भारताने उद्ध्वस्त केले. येथेच मसूदचे नातेवाईक रहात होते.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान आतंकवाद्यांना पोसतो आणि ठार झाल्यानंतरही त्याच्या नातेवाइकांना हानीभरपाई देतो, हे यातून उघड झाले आहे. असे असतांनाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकला २० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य देते, हे आश्चर्यजनक आहे. भारताने यावरून आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला जाब विचारला पाहिजे !