|
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पहलगाम हत्याकांडाला सुरक्षा यंत्रणेतील मोठे अपयश म्हटले होते आणि त्यासाठी सरकारला उत्तरदायी धरले होते. ‘या सूत्रावर पाकिस्तानसमवेत युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याची आवश्यकता नाही’, असे ते म्हणाले.
🇮🇳 Treasonous? Karnataka CM Siddaramaiah’s call for "no war with Pakistan" is now being used as Pakistan’s propaganda! 📢
A leader praising an enemy nation — does Congress, Rahul Gandhi, Priyanka Gandhi, Mallikarjun Kharge see no threat to the Constitution? 🤔 Or is their CM… pic.twitter.com/dcRJbDcOza
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2025
पाकिस्तानी वाहिन्यांकडून सिद्धरामय्या यांच्या विधानाचे प्रक्षेपण
पाकिस्तानच्या ‘जिओ टीव्ही’ या वृत्तवाहिनीने सिद्धरामय्या यांच्या या विधानाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. तसेच ‘हे भारताचे अंतर्गत सुरक्षेतील अपयश आहे. पाकिस्तानला यात अनावश्यकपणे ओढले जात आहे’, असे सांगितले जात आहे.
भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर पाक वृत्तवाहिनीचा हा व्हिडिओ प्रसारित करून लिहिले की, काँग्रेस पाकिस्तानच्या बचावासाठी पुढे आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे म्हणणे पाकिस्तानमध्ये उद्धृत केले जात आहे की, आपण पाकिस्तानशी सामना करण्याऐवजी काश्मीरमधील सुरक्षा उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सिद्धरामय्या मुसलमानांच्या मतांमुळे सत्तेत आहेत, तर आतंकवादी भारतीय हिंदूंची निर्घृण हत्या करत आहेत.
संपादकीय भूमिका
|