Karnataka CM Siddaramaiah : (म्हणे) ‘पाकिस्तानसमवेत युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याची आवश्यकता नाही !’

  • कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राष्ट्रघातकी विधान

  • पाकिस्तानकडून सिद्धरायय्या यांच्या विधानाचा भारताच्या विरोधात वापर !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पहलगाम हत्याकांडाला सुरक्षा यंत्रणेतील मोठे अपयश म्हटले होते आणि त्यासाठी सरकारला उत्तरदायी धरले होते. ‘या सूत्रावर पाकिस्तानसमवेत युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याची आवश्यकता नाही’, असे ते म्हणाले.

पाकिस्तानी वाहिन्यांकडून सिद्धरामय्या यांच्या विधानाचे प्रक्षेपण

पाकिस्तानच्या ‘जिओ टीव्ही’ या वृत्तवाहिनीने सिद्धरामय्या यांच्या या विधानाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. तसेच ‘हे भारताचे अंतर्गत सुरक्षेतील अपयश आहे.  पाकिस्तानला यात अनावश्यकपणे ओढले जात आहे’, असे सांगितले जात आहे.

भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर पाक वृत्तवाहिनीचा हा व्हिडिओ प्रसारित करून लिहिले की, काँग्रेस पाकिस्तानच्या बचावासाठी पुढे आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे म्हणणे पाकिस्तानमध्ये उद्धृत केले जात आहे की, आपण पाकिस्तानशी सामना करण्याऐवजी काश्मीरमधील सुरक्षा उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सिद्धरामय्या मुसलमानांच्या मतांमुळे सत्तेत आहेत, तर आतंकवादी भारतीय हिंदूंची निर्घृण हत्या करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेस म्हणजे पाकिस्तानी राजवट असते, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सिद्धरामय्या यांना सत्तेत बसवणार्‍या कर्नाटकातील हिंदूंनी याविरोधात सिद्धरामय्या यांना जाब विचारला पाहिजे !
  • राज्यघटनेनुसार एका अतीमहत्त्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती शत्रूराष्ट्राचे गुणगान गाते, तेव्हा काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आदी नेत्यांना ‘राज्यघटना धोक्यात आली आहे’, असे वाटत नाही का ? कि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सर्व क्षम्य आहे ?
  • अशांना पदावरून खाली खेचण्याचा अधिकारही जनतेला असला पाहिजे, तरच ती खर्‍या अर्थाने परिपूर्ण लोकशाही म्हणता येईल !