२९.३.२०२५ या दिवशीच्या लेखात आपण मृत्यूनंतर स्थूलदेह तेथेच रहातो आणि लिंगदेह मनोदेह, कारणदेह, महाकारणदेह अन् आत्मा यांसह बाहेर पडतो. प्राणदेहातील काही शक्ती शरिरातून उत्सर्जित होते, तर काही शक्ती त्या लिंगदेहाच्या पुढील प्रवासासाठी वापरली जाते. अशा वेळी सप्तचक्रे आणि त्यांच्याशी संबंधित नाड्या यांचे काय होते ? या प्रश्नासंबंधी लिखाण पाहिले. आज पुढील लिखाण येथे दिले आहे.
(भाग ३)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/897326.html

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तो जीव पुन्हा जन्माला येतांना त्याच्या नवीन देहामध्ये कुंडलिनीचक्रे आणि नाड्या पुन्हा कशा कार्यरत होतात ?

उत्तर : जेव्हा जिवाचा जन्म होतो, तेव्हा त्याच्या स्थूल देहामध्ये त्याचा लिंगदेह प्रविष्ट होतो आणि त्यानंतर लिंगदेहामध्ये सुप्तावस्थेत बीजरूपाने वास करणारी सप्तचक्रे अन् कुंडलिनीनाड्या व्यक्तीच्या स्थूल आणि सर्व सूक्ष्म देहांशी एकरूप होतात. व्यक्तीच्या जन्मानंतर जेव्हा ती पुन्हा साधना करू लागते, तेव्हा तिची सुप्तावस्थेत असणारी कुंडलिनीशक्ती जागृत होऊन ती इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांमध्ये प्रवाहित होते अन् व्यक्तीच्या पातळीनुसार तिच्याशी संबंधित सप्तचक्र जागृत होऊन कार्यरत होते. यालाच ‘व्यक्तीच्या खर्या जीवनाचा’, म्हणजे ‘आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होणे’, असे म्हणतात.
३ अ. व्यक्तीची पातळी (टक्के), तिच्या कार्यरत असणार्या कुंडलिनीनाड्या आणि तिच्या सप्तचक्रांपैकी कार्यरत असणारी मुख्य कुंडलिनीचक्रे
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२४) (क्रमशः)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/898743.html
|