मनुष्याच्या देहातील सप्तचक्रे आणि त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये यांच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नांची सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेली ज्ञानमय उत्तरे !

२८.३.२०२५ या दिवशीच्या लेखात आपण मनुष्याचा स्थूलदेह, प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांपैकी कोणत्या देहात सप्तचक्रे आणि त्याच्याशी संबंधित नाड्या असतात याविषयी ज्ञानमय उत्तर जाणून घेतले. आज त्यापुढील भाग दिला आहे.

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/897047.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मृत्यूनंतर स्थूलदेह तेथेच रहातो आणि लिंगदेह मनोदेह, कारणदेह, महाकारणदेह आणि आत्मा यांसह बाहेर पडतो. प्राणदेहातील काही शक्ती शरिरातून उत्सर्जित होते, तर काही शक्ती त्या लिंगदेहाच्या पुढील प्रवासासाठी वापरली जाते. अशा वेळी सप्तचक्रे आणि त्यांच्याशी संबंधित नाड्या यांचे काय होते ? त्यातील शक्तीचे काय होते ?

सुश्री (कु.) मधुरा भोसले

उत्तर : व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या देहातील सप्तचक्रे आणि इडा, पिंगला अन् सुषुम्ना या तिन्ही कुंडलिनीनाड्या अकार्यरत होऊन सुप्तावस्थेत जाऊन त्यांची बीजे व्यक्तीच्या लिंगदेहात संक्रमित होतात आणि त्यांची शक्ती सुप्तावस्थेत साठून रहाते.

२ अ. सप्तचक्रांची नावे आणि त्यांचे लिंगदेहातील स्थित असणारे स्थान

२ आ. कुंडलिनीनाड्या आणि त्यांचे लिंगदेहातील स्थान

२ इ. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी (टक्के), तिच्या साधनेची स्थिती, तिच्या लिंगदेहामध्ये सप्तचक्रे आणि कुंडलिनीनाड्या यांच्यावर होणारा परिणाम आणि तिच्या लिंगदेहावर होणारा परिणाम : जर व्यक्ती साधना करणारी नसेल, तर तिच्या लिंगदेहामध्ये सप्तचक्रे आणि कुंडलिनीनाड्या यांची बीजे अकार्यरत स्थितीत रहातात. व्यक्तीने तिच्या जिवंतपणी साधना केली असेल, तर तिच्या मृत्यूनंतर सप्तचक्रे आणि कुंडलिनीनाड्या यांची स्थिती पुढीलप्रमाणे असते.

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२४) (क्रमशः) 

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/898418.html

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक