कोणत्याही परिस्थितीत मार्ग दाखवण्यासाठी नामच महत्त्वाचे !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

वासना पालटायला वासनेइतकाच तोडीस तोड इलाज (उपाय) पाहिजे आणि तो म्हणजे भगवंताचे नाम ! चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल, तर तो भगवंताच्या नामाचाच आहे आणि त्याकरता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणेच आवश्यक आहे. ज्याअर्थी कारण सूक्ष्मातील आहे, त्या अर्थी त्याला इलाजही सूक्ष्मातील पाहिजे. म्हणून नामावताराची आज आवश्यकता आहे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे आणि त्याची कास धरणे, म्हणजेच नाम घेणे, हे आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे !

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज