सुसंस्कृत विरुद्ध विकृत मानसिकता !

हिंदूंची फसगत करण्यासाठी मुसलमानांमधील विद्वानही एक मुद्दा उपस्थित करतात तो पुढीलप्रमाणे… ‘इस्लामच्या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी राजकीय सत्तेची निकड भासल्यामुळे मदिनेत गेल्यावर सर्व मदिनेकरता एक राज्य स्थापन करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार महंमद पैगंबर यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली राज्य स्थापना केली. राज्यासाठी आणि राज्यप्रमुखाच्या वतीने प्रेषितांनी एक सनद घोषित केली. तिलाच ‘मदिनेचा करार’ संबोधले जाते. हा मदिनेचा करार, म्हणजेच मदिनेची राज्यघटना होय. या इस्लाम राज्याचे निर्बंध, अधिकार सारे केवळ मुसलमानांसाठीच आहेत, म्हणजे मुसलमान धर्माचा जो अनुयायी नाही, त्याच्यासाठी कोणतेही अधिकार त्या घटनेत देण्यात आले नाहीत.’ असे असतांनाही हा मदिना करार आणि हिंदुस्थानची अस्तित्वात असलेली राज्यघटना यांच्यात साम्य असल्याचा फसवा दावा केला जातो. २२ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘राष्ट्रवादी मुसलमान’ संकल्पना, श्रद्धाहीनांच्या विरुद्ध कसे वागावे ? याविषयी इस्लामी ग्रंथात दिलेली शिकवण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

मागील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/846842.html

५. धर्मांधांच्या राष्ट्र आणि समाज घातकी कृतीला सनदशीर मार्गाने विरोध करणे महत्त्वाचे !

श्री. दुर्गेश परुळकर

हिंदु समाज या जिहादी कृत्यांमुळे बिथरून गेला आहे. याला तोंड कसे द्यावे ? असा प्रश्न सर्वसामान्य हिंदूंना पडला आहे. ‘हिंदूंची कोणतीही कृती मुसलमानांच्या धार्मिक भावनांवर आघात करणारी आहे’, असा सूर मुसलमानांनी लावला आहे. त्यामुळे हिंदूंना त्यांचे सण साजरे करता येत नाहीत, अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर उपाय म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानणे !’ त्यांनी इस्लामी राजवटीच्या विरोधात जोरदार लढा दिला होता. सर्वांत मुख्य म्हणजे धर्मांधांच्या राष्ट्र आणि समाज घातकी प्रत्येक कृतीला आपण सनदशीर मार्गाने विरोध करून स्वसंरक्षणासाठी प्रयत्न करणे नितांत आवश्यक आहे. वास्तविक आपल्याला हातात शस्त्र घेऊन लढण्याचे कारण नाही. आज आपला देश स्वतंत्र असून आपली सत्ता आहे. आपले सैन्यदल, पोलीसदल अस्तित्वात आहे. आपल्या शासनकर्त्यांनी मात्र धर्मांधांच्या विकृतीला आळा घालण्यासाठी हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. ‘हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे’, याचा विसर शासनकर्त्यांना पडता कामा नये.

६. हिंदुस्थानची भूमी इस्लामच्या सावटातून मुक्त करण्यासाठी…

देशातील नागरिकांचे आरोग्य बिघडवण्यासाठी धर्मांध जो किळसवाणा प्रकार करत आहेत, त्यांच्यासाठी त्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. नागरिकांनी स्वतःचे आरोग्य जपण्याच्या हेतूने मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार घातला, तर आश्यर्च ते काय ?

‘मुसलमान समाज जसा वागवेल तसे हिंदु समाजाने मुकाट्याने वागणे, म्हणजे अन्यायाला प्रोत्साहन देणे आणि अकारण स्वतःच्या जीविताची हानी करून घेणे’, असा होतो. यासह देशात शांतता, सुव्यवस्था आणि निर्बंध हे अस्तित्वात नाहीत, ही गोष्ट अधोरेखित करणारी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती, तेच ध्येय त्यांनी आपल्या बांधवांसमोर ठेवले. आपल्यालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावरूनच वाटचाल करावी लागणार आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

हिंदुस्थानची भूमी इस्लामच्या सावटातून मुक्त करण्यासाठी

‘धर्मासाठी मरावे । मरोनी अवघ्यांस मारावे ।
मारिता मारिता घ्यावे । राज्य आपुले ॥

देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा वा बुडवावा । धर्म संस्थापनेसाठी ॥

मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
या विशी न करिता तकवा । पूर्वज हासती ॥

शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने यत्न होत असे ।’

हाच मंत्र आपली हिंदुस्थानची भूमी इस्लामी राजवटीच्या कह्यात जाऊ नये; म्हणून तिचे रक्षण करण्यासाठी कृतीत आणावा लागणार आहे. ही गोष्ट शासनकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आपल्यापुरतेच पहाण्याच्या संकुचित आणि प्रांतीयदृष्टीने हिंदु जातीचा राजकीय अन् धार्मिक विनाश भूतकाळात झाला. त्याची पुनरावृत्ती होऊ न देणे, हेच आपले राष्ट्रीय कर्तव्य मानून कटीबद्ध होणे, हाच प्राप्त परिस्थितीवरचा रामबाण उपाय आहे. (१८.१०.२०२४) (समाप्त)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली.

संपादकीय भूमिका

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची केलेली ध्येयपूर्ती सद्यःस्थिती पाहून हिंदूंनी आज पुन्हा पूर्ण करणे आवश्यक !