
तुर्भे – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागील ५ वर्षांत जे काम झाले आहे, त्याची चौकशी करण्याचे आदेश पणन संचालक शरद जरे यांनी दिले आहेत. यासाठी ४ सदस्यीय विशेष चौकशी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाला २ मासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज, वर्ष २०२१-२०२२ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील लेख्यांची पडताळणी करणे, लेखापरिक्षण विहीत मुदतीत पूर्ण होऊन त्याचा दोषदुरुस्ती अहवाल सादर न करणे, तसेच सदर लेखापरिक्षण आणि दोषदुरुस्ती सादर न झाल्याची कारणे, तसेच संबंधित दायित्व व्यवस्थापन यांची चौकशी करणे, बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली नसल्याची कारणमीमांसा करून दायित्व निश्चित करणे, आयात-निर्यात कक्ष स्थापन करणे, किरकोळ विक्री व्यवसाय चालू नाही ना, अनुज्ञप्त्या आदी गोष्टी पडताळणे यांचा समावेश आहे.
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६