महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ लागू करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन !

मुंबई – महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू करण्यात यावा, यासाठी ३ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंत्रालयाजवळील गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँगेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही या आंदोलनात सहभागी झाले होते.

बदलापूर येथील विद्यार्थिनींवर झालेले लैंगिक अत्याचार आणि राज्यातील महिल्यांवरील वाढते अत्याचार यांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याकडून केंद्रशासनाकडे शक्ती कायद्याचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवण्यात आला आहे; मात्र अद्याप हा कायद्याचा प्रस्ताव केंद्रशासनाने संमत केलेला नाही.