Rahul Gandhi : (म्हणे) ‘देशात मुसलमानांवर आक्रमणे चालू असतांना सरकार मूकदर्शक आहे !’ – राहुल गांधी

हिंदूंवरील आक्रमणांच्या संदर्भात सतत मूकदर्शक असणार्‍या हिंदुद्वेषी राहुल गांधी यांचा थयथयाट !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

नवी देहली – अल्पसंख्याकांवर, विशेषतः मुसलमानांवर सातत्याने आक्रमणे चालू आहेत आणि सरकारी यंत्रणा मूकदर्शक बनली आहे. भाजप सरकारकडून गुंडांना मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळेच त्यांच्यात धाडस निर्माण झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केले. गेल्या काही दिवसांत हरियाणा आणि महाराष्ट्र राज्यांत जमावाकडून झालेल्या हत्यांविषयी ते बोलत होते.

राहुल पुढे म्हणाले की, भाजप पक्ष द्वेषाचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करून सत्तेच्या शिडीवर चढत आहे आणि देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. गुन्हेगार उघडपणे हिंसाचार करत असून त्यांना भाजप सरकार शक्ती पुरवत आहे. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. भाजपने कितीही प्रयत्न केले, तरी द्वेषाच्या विरोधात भारताला एकत्र करण्याची लढाई आम्ही जिंकू.

संपादकीय भूमिका 

राहुल गांधी यांना मुसलमानांची इतकी काळजी आहे, तर ते अशांत असलेल्या मध्य-पूर्व, अफगाणिस्तान, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत, तसेच मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या चीनमध्ये त्यांच्या रक्षणासाठी का जात नाहीत ?