Baloch Liberation Army : मरायचे नसेल, तर बलुचिस्तान सोडून निघून जा ! – बलुच लिबरेशन आर्मी

‘बलुच लिबरेशन आर्मी’ची चीन आणि पाकिस्तान यांना चेतावणी !

इस्लामाबाद – बालुचिस्तानची भूमी केवळ बलुच लोकांची आहे. पाक आणि चीन येथील लोक या भूमीवर राहिले, तर त्यांची हानी होईल. चीन आणि पाकिस्तान यांच्या लोकांना मरायचे नसेल, तर त्यांनी बलुचिस्तान सोडून निघून जावे, अशी धमकी ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या मजीद ब्रिगेडने पाक अन् चीन यांना एका व्हिडिओद्वारे दिली.

बलुचिस्तानमध्ये ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने पाकिस्तानी सैन्यदलावर नुकतेच आक्रमण केले. त्यांनतर केलेल्या आक्रमणानंतर ही धमकी देणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे.