देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !

 

श्रीराम यज्ञात सहभागी दांपत्ये

कोल्हापूर – जगभरात शांतता नांदून देशभरात चांगला पाऊस पडावा, यासाठी ब्राह्मण सभा करवीर यांच्या वतीने मंगलधाम येथे राम पंचायतन हवन, श्रीराम यज्ञ करण्यात आला. या वेळी १ सहस्र ८०० आहुतींचे हवन करण्यात आले. संस्थेच्या वतीने चालू असलेल्या ‘श्रीराम कथा सोहळ्यां’तर्गत हा धार्मिक उपक्रम राबवण्यात आला. गणेशपूजन, पुण्यहवचन, राममूर्ती स्थापना, नवग्रह पूजन असे धार्मिक विधी, त्यानंतर देवतापूजन करतांना पुरश्चरण झाले.

या वेळी अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, डॉ. उदय कुलकर्णी, श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, प्रसाद खाडीलकर, रामचंद्र टोपकर, विवेक शुक्ल, पूजा जोशी, संतोष कोडोलीकर उपस्थित होते.