ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !

   

पुणे – यंदा तीव्र उन्हाळ्यामुळे अनेक भागातील जलस्रोत आटले आहेत. महाराष्ट्रातील काही भागांत अजूनही पाऊस न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई जाणावत आहे. राज्यात १ सहस्र २०० टँकरद्वारे अनुमाने २२ लाखांहून अधिक लोकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्याची उपलब्धता, पावसाची स्थिती आणि स्थानिक मागणी यांनुसार टँकरच्या संख्येत पालट होत आहे. मान्सून सक्रीय होऊन धरणे, विहिरी आणि स्थानिक जलस्रोत भरेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.