|

पनवेल, २९ जुलै (वार्ता.) – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मृत यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांच्या समवेत आहे. आरोपी दाऊद शेख याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नवी मुंबई येथील कोपरखैरणे, नेरूळ आणि उरण भागांत महिला अन् तरुणी यांची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनांमुळे समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व घटनांतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा होण्यासाठी हे खटले जलदगती न्यायालयात चालवून कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २९ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली. या मागणीचे निवेदन त्यांनी शिष्टमंडळासह नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना भेटून दिले. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून धर्मांध दाऊद शेख याने कु. यशश्री शिंदे हिची अमानुषपणे हत्या केल्याची घटना २ दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेचा राज्यात निषेध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तिच्या कुटुंबियांची अंबादास दानवे यांनी त्यांच्या रहात्या घरी भेट घेऊन सांत्वन केले. त्या वेळी ते बोलत होते.
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, या प्रकरणी आम्हाला राजकारण करायचे नाही. आरोपीचा शोध चालू आहे. आरोपी वाचणे शक्य नाही. नवी मुंबई पोलीस त्यांंचे काम करत आहेत. त्यांना पुरेसा वेळ मिळायला हवा. ४८ घंट्यांच्या आत पोलीस आरोपीला शोधून काढतील, असा विश्वास आहे.
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा ! – पंतप्रधान
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा