भारतमातेला पुन्हा सिंहासनावर विराजमान करा !

स्वामी विवेकानंद यांची शिकवण 

बंधूनो, आपण सर्वजण सतत कार्य करूया, ही काही झोप घेण्याची वेळ नाही ! भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे. तिच्या डोळ्यांवर केवळ झापड आलेली आहे. उठा, जागे व्हा आणि आपल्या या भारतमातेला तिच्या त्या शाश्वत सिंहासनावर पुन्हा विराजमान झालेली पहा ! तिच्यात नवचैतन्याचा संचार होऊ द्या आणि पूर्वी कधीही तिला लाभले नसेल, अशा संपूर्ण वैभवाने ती परत तळपू द्या.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)