स्वामी विवेकानंद यांची शिकवण

धीर व्हा, साहसी व्हा. माझ्या संतानांनी (मुलांनी) प्रथम वीर बनले पाहिजे. कोणत्याही कारणाने सत्याशी थोडीही तडजोड करू नका. नाना प्रकारची प्रलोभने समोर असूनही जर तुम्ही सत्याला चिकटून रहाल, तर तुमच्या ठायी अशी दैवीशक्ती उत्पन्न होईल की, जिच्यासमोर तुम्ही ज्या गोष्टी सत्य मानत नाही, त्यांच्यासंबंधी तुमच्याशी बोलण्यास लोकांना भय वाटेल. सतत १४ वर्षे तुम्ही जर कठोरपणे सत्याचे अखंड पालन करू शकला, तर तुम्ही जे काही म्हणाल, त्यावर लोक पक्का विश्वास ठेवतील.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?