Toll Tax : राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरामध्ये ५ टक्क्यांनी वाढ  

नवी देहली – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३ जूनपासून टोल दरात ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, टोल दरात प्रतिवर्षी वाढ करण्यात येत असते. आताची दरवाढ आधीच होणार होती; मात्र आचारसंहितेच्या काळात टोल दरात वाढ करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते.

यामुळे टोल दरवाढ निवडणूक काळात रोखण्यात आली होती. आता टोलच्या दरात ३ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्यात येत आहे. देशभरातील १ सहस्र १०० टोल केंद्रावर टोल दरवाढ होणार आहे.