निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८ सहस्र ८८९ कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ आणि अन्य वस्तू जप्त !

नवी देहली – लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कालावधीत निवडणूक आयोगाने ८ सहस्र ८८९ कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ आणि अन्य वस्तू जप्त केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी चिथावणी देणार्‍यांवर निवडणूक आयोग कठोर कारवाई करत आहे.

संपादकीय भूमिका

हे आकडे म्हणजे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची थट्टाच नव्हे का ?