Accident In Rajasthan:राजस्थानमध्ये चारचाकी गाडीच्या अपघातात ६ जणांचा मृत्यू


सवाई माधोपूर (राजस्थान) – राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी झालेल्या वाहन अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात २ मुले घायाळ झाली आहेत. त्यांना जयपूरमधील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवलगढ येथील शर्मा कुटुंबीय चारचाकीमधून रणथंबोर त्रिनेत्र गणेश मंदिराकडे जात होते. ५ मे या दिवशी सकाळी ८ वाजता सवाई माधोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनास पुलियाजवळ त्यांची गाडी ट्रॅक्टरला धडकली.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश यादव यांनी सांगितले की, चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला असून मृतदेह बाहेर काढणे कठीण होते. अपघातग्रस्त कुटुंबियांचे नातेवाईक घटनास्थळी पोचल्यानंतरच मृतांच्या नावांची अधिकृत पुष्टी होणार आहे.