ध्येयनिष्ठ दैनिक ‘सनातन प्रभात’चे २५ व्या वर्षात पदार्पण !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्तीला दिनांकानुसार २४ वर्षे पूर्ण होऊन आज (४ मार्च या दिवशी) दैनिक २५ व्या म्हणजे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण यांद्वारे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध असलेले ‘सनातन प्रभात’ नियतकालिक एक ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ म्हणून गेली दोन तपे अखंड कार्यरत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण आणि ‘सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा, तसेच वाचक, हितचिंतक अन् विज्ञापनदाते यांचे प्रेम यांमुळे आम्ही ही वाटचाल करत मार्गस्थ आहोत. यासाठी भगवंताच्या चरणी अपार कृतज्ञता !